पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

बालगोपाळ जगत १०


बालगोपाळ जगत १०

लहान मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करण्यासाठी उपयुक्त online test series

इयत्ता ४ थी
विषय परिसर अभ्यास भाग २
घटक १३ वा
बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या

निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
  1. आगऱ्याला जाताना शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार ...........हाती सोपवला.

  2. मोरोपंत पिंगळेंच्या
    दादाजी कोंडदेवांच्या
    शहाजीराजांच्या
    जिजामातेच्या

  3. शिवराय बादशाहाच्या दरबारात गेले, त्या दिवशी औरंगजेब बादशाहाचा ...........वाढदिवस होता .

  4. साठावा
    चाळिसावा
    पंचाहत्तरावा
    पन्नासावा

  5. मराठ्यांकडून अनेक वेळा पराभूत होऊन पळालेला ...........हा बादशाहाच्या दरबारात महाराजांच्या पुढे होता

  6. जसवंतसिंग राठोड
    दिलेरखान
    उदेभान
    मिर्झाराजे जयसिंग

  7. शिवरायांना मागील रांगेत उभे केले म्हणून , ते ............दरबारातून रागारागाने बाहेर पडले.

  8. निजामशाहाच्या
    औरंगजेबाच्या
    कुतुबशाहाच्या
    आदिलशाहाच्या

  9. आपला अपमान झाला आहे , असे वाटल्यानंतर शिवरायांनी काय केले ?

  10. बादशाहाला अभिवादन केले नाही.
    आपणांस पहिल्या रांगेत बसण्यास जागा द्यावी , असे बादशाहाला सुचवले .
    बादशाहाची भेट न घेता , ते आपल्या मुक्कामावर निघून गेले.
    बादशाहाबद्दल कुत्सित उद्गार काढले .

  11. औरंगजेब बादशाहाने शिवरायांशी कोणती दगलबाजी केली ?

  12. दरबारात मागच्या रांगेत उभे केले .
    दरबारात पहिल्या रांगेत बसण्यास जागा दिली नाही.
    हिंदवी स्वराज्य खालसा केल्याची घोषणा केली.
    शिवरायांना कैद केले.

  13. आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी करण्याची विनंती बादशाहाने लगेच मान्य केली ; कारण

  14. या माणसांमुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या .
    शिवरायांचे बळ त्यामुळे कमी होणार होते.
    शिवाजींची माणसे त्याच्या राज्यात धुमाकूळ घालत होती .
    एवढया माणसांचा खर्च त्याला करावा लागत होता .

  15. आगऱ्याच्या कैदेत शिवरायांबरोबर कोण राहिले ?

  16. संभाजीराजे , हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर
    संभाजीराजे
    हिरोजी फर्जंद
    मदारी मेहतर

  17. आजार बरा व्हावा, म्हणून शिवरायांनी काय केले ?

  18. औषधोपचार सुरु केले .
    योगसाधना सुरु केली .
    साधू व मौलवींना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली .
    पंडिताकरवी होम -हवन करवून घेतले .

  19. शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली ?

  20. आपल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली.
    आजारी पडल्याचे सोंग केले .
    पहारेकऱ्यांना मिठाई आणि जडजवाहीर दिले.
    बादशाहाला महाराष्ट्रात परत जाऊ देण्याची विनंती केली .

  21. मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटताना शिवरायांनी ..............यास आपल्या जागी झोपवले .

  22. रामसिंग
    संभाजी
    मदारी मेहतर
    हिरोजी फर्जंद

  23. हिरोजी व मदारी कैदेतून कसे निसटले ?

  24. पेटाऱ्यातून
    महाराजांची औषधे आणायला जातो , असे सांगून .
    बादशाहाच्या परवानगीने
    आजारी पडल्याचे सोंग करून

  25. आगऱ्याहून येताना शिवरायांनी संभाजीराजांना ............येथे एका सुरक्षित ठिकाणी ठेवले .

  26. मथुरा
    बनारस
    झाशी
    ग्वालियर

  27. शिवरायांची आगऱ्याहून सुटका ही घटना सन .........मध्ये घडली.

  28. १६४६
    १६५६
    १६६६
    १६७६

चाचणी कशी वाटली प्रतिक्रिया आवश्य द्या
सर्वांसाठी शेअर करा
प्रेरणा द्या प्रेरणा घ्या
परत परत या साईटला भेट देत राहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा